रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यात सात वर्षीय मुलीची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. साक्षी भायजे असं या लहानग्या मुलीचं नाव असून, धामापूर गावात ही घटना घडली आहे.
या हत्येप्रकरणी साक्षीच्या शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय राघो धनावडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. काल संध्याकाळी गावात खेळत असताना धनावडेंनी साक्षीला आपल्याजवळ बोलावलं आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात धनावडेंनी साक्षीच्या गळ्यावर कोयत्याने वार केले.
हत्येनंतर नराधम आरोपीने साक्षीचा मृतदेह एका खड्ड्यात पुरला. त्यानंतर धनावडे गायब झाला होता. हा प्रकरणाची उकल झाल्यानंतर आरोपी राघो धनावडेनं हत्येची कबुली दिली. मात्र हत्येमागचं कारण मलाच ठाऊक नाही असंही त्यानं पोलिसांना सांगितलं. दरम्यान, हत्येमागच्या कारणाचा पोलीस कसून शोध घेत आहेत.