विर्डी (पाणसाखळ) येथे भरत गवस व शब्बीर लांबे यांच्या कोकण रबर प्लान्टेशनला बुधवारी रात्री आग लागली. यामध्ये दोन्ही शेतक-यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० एकर जागेतील सुमारे १२ हजार रबराची झाडे जळाली असून साधारण ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल असून घटनास्थळाची दोडामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली.
दोडामार्ग तालक्यापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर गोव्याच्या सीमेवर विर्डी गाव आहे. या ठिकाणच्या पाणसाखळ येथील डोंगर भागात परप्रांतीयांनी जमिनी घेतल्या आहेत. याच ठिकाणी भरत गवस व शब्बीर लांबे यांनी शेकडो एकर जमिनीत रबर लागवड केली आहे.
पाणसाखळ जंगलात कोकण रबर प्लान्टेशनला बुधवारी अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे. कारण ज्या ठिकाणी ही रबर बाग आहे. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही जाण्यासाठी चारचाकी गाडी आवश्यक आहे.
एवढय़ा मोठय़ा बागेत राखण करण्यासाठी असणा-यांच्या किंवा त्यालाच लागून खाली बागायती असल्यामुळे सदर व्यक्ती निर्दशनास आली असती. अज्ञाताने लागलेल्या या आगीत रबर लागवडीपैकी दोन ते तीन एकर रबर खाक झाला. यामध्ये दोन्ही शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.