“रिझर्व्ह बँकेच्या मते सध्या आणखी दरकपातीला वाव नाही. त्यामुळे जरी सरकारची दरांमध्ये कपात करण्याची इच्छा असली तरीही नव्या संधी निर्माण होईपर्यंत हेच व्याजदर योग्य आहेत”, असे विधान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे.
“आरबीआयने सद्य परिस्थितीचा पुर्णपणे फायदा घेत व्याजदरात जेवढी शक्य आहे तेवढी कपात केली आहे”, असेही ते म्हणाले. .
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सप्टेंबर महिन्यात झालेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात तब्बल 0.50 टक्क्यांची कपात करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता रेपो दर 7.25 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे.