खिलाडी अक्षय कुमारची उस्मानाबादला 40 लाखांची मदत

खिलाडी अक्षय कुमारची उस्मानाबादला 40 लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारकडून मदतीचा ओघ सुरुच आहे. अक्षय कुमारने बीडपाठोपाठ आता दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 40 लाखांची मदत घोषित केली आहे.

उस्मानाबादमधील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अक्षय मदत करणार आहे.

याआधी अक्षयने बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 90 लाखांची मदत दिली होती. याशिवाय जलयुक्त शिवार योजनेसाठीही त्याने मुख्यमंत्र्यांना 50 लाखांचा चेक दिला होता.

मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार एवढ्यावरच थांबला नाही तर पुन्हा एकदा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *