सद तसंचत विधीमंडळाच्या अंदाज समितीची अध्यक्ष आणि सदस्यांसाठी राज्याच्या निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्यांनी काटकसर करण्याची शिफारस देणं अपेक्षित असतं त्याच अंदाज समितीच्या परिषेदत जेवणावर पैशांची विनाकारण उधळण करण्यात आली. समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीची थाळी मागवण्यात आली होती. इतकंच नाही तर त्यांच्या जेवणावर एका ताटामागे राज्य विधिमंडळाकडून 4500 रुपये खर्च करण्यात आले आहेत.
संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समितीचीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत मंगळवारी समारोप झाला. समारोपाच्या निमित्ताने सदस्य आणि अध्यक्षांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासाठी चांदीच्या ताटातून पंचपक्वानाची सोय केली होती. विशेष म्हणझे चांदीच्या ताटातचे एका दिवसाचे भाडे 550 रुपये होतं. तसंच एका ताटामागे जेवणासाठी 4000 रुपये अशाप्रकारे एका व्य्क्तीमागे एकूण 4500 रुपये खर्च करण्यात आले.
ताटासह चमचे, वाट्या, ग्लास सगळं काही चांदीचं होतं. चांदीच्या ताटात जेवण्यासाठी खास मेन्यूही ठेवण्यात आला होता. ज्यामध्ये कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी, पुरण पोळी यांचा समावेश होता.
अंदाज समित्यांचे एकूण 600 अतिथी परिषदेत सहभागी झाले होते. यामधअये अध्यक्ष, सदस्य असे 250 विशेष, आणि 250 अधिकारी होते. स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर 40 फूट उंचीच्या फलकांच्या भिती उभ्या करण्यात आल्या होत्या. तसंच ताज पॅलेस आणि ट्रायडंटला राहण्याची सोय करण्यात आली होती. विधिमंडळाच्या परिसरात मलमली कापडाचे वातुनूकुलित शामियाने उभे केले होते. ज्यामध्ये झुंबरं लावली होती.
इतकंच नाही तर हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवासासाठी वाहनं आणि मुंबईची सहल असंही नियोजन करण्यात आलं होतं. अंदाज समितीने सरकारला काटकसर करण्यासाठी शिफारस करण्याची अपेक्षा असताना त्यांच्यात अधिवेशनात उधळपट्टी झाल्याने राज्या विधिमंडळाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहे.