तुम्हाला जर अचानक ट्रेननं प्रवास करावा लागला आणि कन्फर्म तिकिट उपलब्ध झालं नाही तर तुम्हाला एक चिंता वाटू लागते. ती चिंता म्हणजे तिकिट कन्फर्म होणार की नाही. वेटिंग तिकिटाला घेऊन सगळेच चिंतेत असतात कारण हे तिकिट कन्फर्म होईल याची अनिश्चितता जास्त असते. आता ही चिंता वाढते ती ट्रेन सुरु होण्याच्या काही तास आधी जेव्हा तुमचं तिकिट हे कन्फर्म होत नाही. अशात प्रवासी हे दुसरा पर्याय शोधू लागतात किंवा जसं जमेल तसा ट्रेननं प्रवास करतात. पण आता रेल्वे बोर्डानं वेटिंग तिकिटांवरून प्रवाशांना समोरे जाणाऱ्या त्रासाला पाहता एक नवा नियम काढला आहे. वेटिंग तिकिटांवरून एक नवा नियम लागू केला असून क्षमतेच्या 25 टक्के ही वेटिंग तिकिट असतील. हे नियम कशा प्रकारे लागू होणार, त्याचा कसा फायदा होणार, कोणत्या श्रेणीसाठी हे नियम असणार, कोणत्या कोट्यात हे नियम लागू होणार नाही हे सगळं जाणून घेऊया.
आता भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकींगची मर्यादा निश्चित केली जाणार आहे.एकूण तिकीटांच्या केवळ 25 टक्के तिकीटांनाच वेंटीगसाठी ठेवले जाणार आहे. त्यामुळे आता तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून सुटका होणार आहे. तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची संधी अधिक असणार आहे.
आता कसं होणार बूकिंग?
रेल्वेच्या नव्या नियमानुसार AC फर्स्ट क्लास, सेकेंड आणि थर्ड, स्लीपर आणि चेअर कार अशा प्रत्येक श्रेणीत एकूण सीटच्या कमाल 25 टक्के भाग हा वेटिंग तिकीटाच्या स्वरुपात बुक केला जाऊ देणार आहे. म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये जर 800 सीट असतील तर केवळ 200 तिकीटच वेटींगमध्ये जातील त्यानंतर त्या क्लासची तिकीट बुक होणार नाही.
आतापर्यंत काय होते वेटिंग तिकिटाच्या बूकिंगचे नियम
आतापर्यंत वेटिंग तिकिटाच्या बूकिंगला घेऊन रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये वेगवेगळे नियम होते. जसे की सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये 40 टक्के वेटिंग तिकिट बूक व्हायचे. तर काहींमध्ये 700 सीट बूकिंग करण्यात यायच्या. त्यावरून जानेवारी 2013 मध्ये एक सर्कुलर जारी करण्यात आला होता. त्यानुसार, फर्स्ट एसीमध्ये 30, सेकेन्ड एसीमध्ये 100, थर्ड एसीमध्ये 300 आणि स्लीपरमध्ये 400 वेटिंग लिस्ट तिकिटं बूक करण्यात येत होते.
गर्दीपासून सुटका, प्रवास सुखाचा
सध्या वेटिंग तिकीट जादा जारी केले जात असल्यानं कन्फर्म तिकीटांशिवाय अनेक वेटिंग तिकीट वालेही आरक्षित डब्यात घुसखोरी करतात. त्यामुळे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे मुळ आरक्षित प्रवाशांना अडचण होत असते. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की नव्या नियमांमुळे बेकायदेशीर प्रवाशांची डब्यातील घुसखोरी कमी होण्यास मदत होणार आहे.