लातूरमध्ये एका पानटपरीवर ५० रुपये देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीचा खून झाला. ही घटना लातूर शहरातील बाबळगाव नाका परिसरात घडली. आरोपींनी कोयत्याने वार करून गणेश उत्तम सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला मारले. या हल्ल्यात मृताच्या दोन नातेवाईकांनाही जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गणेश सूर्यवंशी यांचा पानटपरीचा व्यवसाय होता. त्यांनी आरोपी अब्बास शेख याच्याकडे मामाच्या दुकानातील उधारीचे ५० रुपये मागितले होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. “सुपारी खाऊन पैसे न दिल्याने वाद विकोपाला गेला,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.