राज्यात सध्या आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील मुंबई पालिकेसाठी रणनीती आखण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेसाठी खास 12 शिलेदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाहूयात कोण आहेत ते ठाकरेंचे बारा शिलेदार?
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान या निवडणुकींसाठी ठाकरेंची शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 शिलेदारांना मैदानात उतरवलंय. या बारा शिलेदारांवर मुंबई पालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
1. अमोल किर्तीकर यांच्याकडे दहिसर, बोरिवली, मागाठाणेची जबाबदारी.
2. उद्धव कदमांकडे चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम,
3. विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
4. विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
5. रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
6. गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला
7. नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड
8. सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
9. मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
10. अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
11. अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
12. सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. कारण ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याच विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विशेष रणनीती आखली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेनं दोन दिवसांपूर्वी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. मुंबईच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारला घेरण्यात येणार आहे. आणि आता उद्धव ठाकरेंनी आपल्या 12 विश्वासू नेत्यांकडे मुंबईची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या रणनीतीचा पालिका निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.