25 जणांशी लग्न करुन त्यांना लुटलं, पण 26 व्या लग्नात फसली; तिने विचारही केला नाही अन् नवराच…

लग्नाच्या नावाखाली दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होणाऱ्या नवरीमुलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुराधा पासवान असं या आरोपी तरुणीचं नाव असून, तिने तब्बल 25 तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून गंडा घातला आहे. आतापर्यंत तिने लाखोंची रक्कम लुटली आहे. अनुराधा प्रत्येक शहरात आपला सावज शोधत असे. आपलं लक्ष्य साध्य झाल्यानंतर ती नवं नाव, नवं शहर शोध तिथे नवा सावज शोधायची. यानंतर ती आपण सर्वोत्तम सून होऊ असं नाटक करत तरुणाला लग्नाच्या बेडीत अडकवत असे अन् नंतर दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत असे. पोलिसांनी तिला अटक करण्यासाठी तिचीच मोडस ऑपरेंडी वापरली. खोट्या विवाहाच्या नावाखाली तिलाच लग्नाच्या हॉलपर्यंत आणून बेड्या ठोकण्यात आल्या.

आपण एकटे, गरीब आणि हतबल आहोत. आपण बेरोजगार आहोत. लग्न कऱण्याची इच्छा आहे, मात्र आर्थिक स्थिती नवं आयुष्य सुरु करण्यात अडथळे निर्माण करत आहे अशी कहाणी 32 वर्षीय अनुराधा पासवान सर्वांना सांगत असे. पण ती एका बनावट लग्नाच्या गँगची म्होरकी आहे जी विश्वास जिंकून पैसे लुटायची याची कोणालाही कल्पना नव्हती. अनुराधाच्या गँगचे लोक तिचे फोटो काढायचे आणि मग योग्य जोडीदार असल्याचं दर्शवत तरुणाला जाळ्यात ओढत. तिच्या गँगचा सदस्य असणारा मॅचमेकर यासाठी 2 लाख रुपये घेत असे.

एका का डील झाली, की मग विवाहासाठी तयार असल्याचं पत्र तयार केलं जात असे. मंदिर किंवा घऱात प्रथेप्रमाणे शपथा घेतल्या जात असतं. यानंतर खरा खेळ सुरु व्हायचा. अनुराधा तिच्या तिच्या सासरच्या लोकांसोबत खूपच गोड आणि भोळेपणाने वागत असे. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी, ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी नातेसंबंध प्रस्थापित करायची. काही दिवसांतच, ती तिच्या कटाचा शेवटचा भाग येत असेल. ती अन्नात गुंगीचं औषध मिसळायची आणि त्यानंतर दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जात असे.

२५ पीडितांपैकी एक असलेल्या विष्णू शर्माने लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. 20 एप्रिलला सवाई माधोपूर येथील रहिवासी विष्णू शर्माने मध्य प्रदेशातील पासवानशी लग्न केलं. मित्र आणि कुटुंबाच्या उपस्थितीत हिंदू प्रथेप्रमाणे हे लग्न झालं. ब्रोकर पप्पू मीना याच्यामार्फत लग्न ठरविण्यात आलं होतं, ज्यासाठी विष्णूने त्याला दोन लाख रुपये दिले होते.

लग्नाच्या दोन आठवड्यांतच पासवान 1.25 लाख रुपयांचे दागिने, 30 हजार रुपये रोख आणि 30 हजारांचा मोबाईल फोन घेऊन पळून गेली. “मी हातगाडी चालवतो आणि कर्ज घेऊन लग्न केलं होतं. मी एक मोबाईलदेखील उधार घेतला होता, तिने तो देखील नेला. ती फसवू शकते याची मला जराही कल्पना आली नाही,” असं विष्णू शर्माने सांगितलं.

पासवान पळून गेल्याच्या रात्रीबद्दल सांगताना त्याने म्हटलं की, मी रात्री उशिरा कामावरून परतलो आणि जेवणानंतर लगेच झोपलो. “मला सहसा जास्त झोप येत नाही, पण त्या रात्री मी बाळासारखा झोपलो, जणू कोणीतरी मला झोपेची गोळी दिली आहे,” असं त्याने सांगितलं. शर्माच्या आईलाही धक्का बसला आहे. यानंतर, शर्मा कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली.

राजस्थान पोलिसांचं युनो रिव्हर्स

विष्णूने दिलेल्या माहितीच्या आधारे, सवाई माधोपूर पोलिसांनी पासवानसाठी सापळा रचला. एका कॉन्स्टेबलने संभाव्य वर म्हणून उभा राहिला. तसंच एजंटचा ग्राहक देखील होता, ज्याने अनेक महिलांचे फोटो दाखवले.

“तपासणी केल्यानंतर, सर्व कागदपत्रे आणि लग्नाचे करार बनावट असल्याचे आढळून आले. आमच्या टीमकडून, आम्ही एका कॉन्स्टेबलला नवरदेव म्हणून तयार केलं आणि महिलेला लग्नासाठी फसवले,” असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. पासवानला भोपाळमध्ये अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *