पाकिस्तानने हस्तक्षेप करु नये – राजनाथ

पाकिस्तानने हस्तक्षेप करु नये – राजनाथ

भारतातील प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करु नये असे स्पष्ट करतानाच शेजारील देशांना स्वत;चे हित हवे असल्यास त्यांनी कुटिल कारवाई कऱणे बंद करावे अशी सक्त ताकीद केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिली आहे.

पाकिस्तानला स्वत:चे हित हवे असेल तर त्यांनी इतर देशांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे बंद करावे. भारताविरोधी सर्व कुटिल कारवाया बंद कराव्या असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला. जम्मूमधील जन कल्याण पर्व या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारताचा अभिमान, एकतेला जे कोणी धोका पोहोचवत असेल त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आमचा आमच्या लष्कर, निमलष्करी दलावर आणि जवानांवर संपूर्ण विश्वास आहे. त्यांच्या देशाप्रती असलेल्या प्रेमावर आणि निष्ठेवर कोणीही सवाल उभा करु शकत नसल्याचे राजनाथ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *