कोकणात पावसाची शक्यता असून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या इशाऱ्यानंतर मासेमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावर आणण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे.
कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांत कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादकांसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे समुद्रातील बोटींनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बोटी समुद्रातून परत आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामान बदलत आहे.
महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर एप्रिल महिना सुरु होईल. यापासूनच अवकाळी पावसाची सुरुवात होईल. महाराष्ट्रात एप्रिलपासून विचित्र वातावरण असेल. कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस यामुळे वातावरणावर खूप परिणाम होईल. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हवामान खात्याने काय म्हटले?
हवामान विभागाचे तज्ज्ञ सुप्रीत कुमार यांच्या मते, पुढील दोन दिवसांत तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी ४२ ते ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात 40 ते 42 अंशांच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. कोकण भागात दिवसा उष्ण हवामान असते आणि संध्याकाळी पाऊस पडतो. जोरदार वाऱ्यांमुळे, मिरकरवाडा, राजीववाडा, मिर्या, साखरतर, जाकादेवी, कासारवेली, जयगड, नाटे आणि हर्णे येथील बहुतेक बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत.
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
कर्नाटक समुद्राकडे सरकणाऱ्या चक्रीवादळामुळे, 30 मार्च रोजी कोकण किनाऱ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे आंबा उत्पादक चिंतेत पडले आहेत आणि मच्छिमारांनी त्यांच्या बोटी किनाऱ्यावर उभ्या केल्या आहेत. पुढील दोन दिवस दिवसाचे तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढू शकते. रात्रीच्या वेळी तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
या भागात उच्च तापमान
यानंतर तीन दिवस कोणताही बदल होणार नाही. पण मे महिन्यात आधीच खूप उष्णता असते. अवकाळी पाऊस आणि उष्णतेमुळे परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. नागपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा आणि अमरावती येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अनेक भागात तापमान 42 अंशांपेक्षा जास्त झाले.
