ठाण्यातील रहिवाशाचे घर बेकायदेशिररित्या विकल्याच्या आरोपाखाली खेरवाडी पोलिसांनी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला.

तक्रारदार चंद्रकांत साळुंखे (४३) हे ठाणे येथील रहिवासी आहेत. १९७६ मध्ये त्यांना म्हाडाच्या वतीने ठाण्यात घर वितरीत झाले होते. १९९८ मध्ये साळुंखे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. त्यावेळी त्यांनी खोली काहीकाळ भाडे तत्त्वावर दिली. पुढे बराच काळ त्या खोलीत कोणी राहत नव्हते. त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सूनने सासऱ्यांच्या सूचनेवरून त्या खोलीवर बेकायदा ताबा घेतला. तसेच स्वतःच्या नावावर नोंदवून खोलीची विक्री केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

साळुंखे यांनी मुलाच्या मदतीने तपासणी केली असता याप्रकरणी बनावट कागदपत्र बनवण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयाच्या निर्देशानुसार याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *