पंतप्रधानांसाठी पदपथ मोकळे होतात; तर सर्व सामान्यांसाठी का नाही? उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, महापालिकेला संतप्त प्रश्न

पंतप्रधान अथवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तीं (व्हीआयपी) दौऱ्यावर येणार असतील, तर एक दिवस आधी पदपथ आणि रस्ते फेरीवालामुक्त केले जातात. मग हाच शिरस्ता सर्वसामान्यांसाठी का लागू केला जात नाही ? त्यांच्यासाठी कायमस्वरूपी फेरीवालामुक्त पदपथ का उपलब्ध केले जात नाहीत ? असा संतप्त प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरपकार आणि मुंबई महापालिकेला केला. न्यायालय एवढ्यावरच थांबले नाही, तर पदपथांवरील अतिक्रमणांची समस्या कशी सोडवायची यावर केवळ विचारमंथन करण्यात वेळ न दवडता ती सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे न्यायालयाने बजावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *