सोयाबीनवर गोगलगायचे संकट, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतकरी अडचणीत

बीड जिल्ह्यात यंदा तीन लाख हेक्टर वर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पण या वर्षीही गोगलगायचे संकट यावर आता आल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे अंकुर पुरताच गोगलगायचा हल्ला होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी याचा फटका बसल्यानंतर आता यावर्षी कृषी विभाग आणि शेतकरी यावर उपाययोजना करत असले तरी हे संकट कायम आहे.

गत तीन वर्षापासून अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यात सोयाबीनवर गोगलगायचे संकट येत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून पहिल्या वर्षी तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यानंतर कृषी विभागाने उपाय योजना सांगितल्या, त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी झाले असले तरी, अद्याप हे संकट कायम असल्याचे दिसत आहे. आता कृषी विभाग यावर उपाययोजना कधी करतो आणि शेतकऱ्यांना या संकटातून कधी मुक्तता मिळते हा प्रश्न कायमच आहे.

गोगलगायमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने दोन महिन्यांपासूनच यावर उपाययोजनांसाठी कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच या गोगलगायच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना देखील सुचवले आहेत. परंतु गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्या त्यांना याचा कमी फटका बसणार आहे, असे असले तरी कृषी विभागाचे अधिकारी आताही थेट बांधावर जाऊन याची पाहणी करत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो. तर कधी गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होते. आता गोगलगायच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *