रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क – उदय सामंत

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा शिवसेनेकडे होती आणि राहिलही ,असा दावा करीत ही जागा आम्ही अडिच लाख मतांनी जिंकू, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

सामंत गुरुवारी नागपूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्याशी विमानतळावर पत्रकारांनी संवाद साधला. जागा वाटपासाठी वेळ का लगतो आहे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी लवकरच जागा वाटप होईल व यादी जाहीर केली जाईल, असे सांगितले. सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ शिवसेनेचा आहे. आता तेथे सेनेचे खासदार आहे. पण ते आमच्या सोबत नाही. पण ही जागा शिंदे गटच लढणार व जिंकणार, असे सामंत म्हणाले.

 पूर्व विदर्भातील रामटेकची जागा शिंदे गटाला सुटली आहे. तेथे शिंदे गटाने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना डावलून कॉंग्रेसमधून आलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक नाराज आहे. तुमानेसुद्धा नाराज आहेत. आज सामंत यांनी तुमाने यांची भेट घेतली व चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *