ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला तर…; १ एप्रिलपासून रेल्वेच्या सुविधेत मोठा बदल

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सेवा- सुविधांसाठी अनेक बदल, नियम करत असते. असाच एक नवा बदल भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून लागू करणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकणारी भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून रेल्वे कॅटिंग(की कँटीन), तिकीट, दंड आणि पार्किंगपर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करत आहे. विशेष म्हणजे आता रेल्वे विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून क्यूआर कोड स्कॅनिंगच्या मदतीने दंड वसूल करणार आहे. रेल्वेच्या या नव्या बदलामुळे आता प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

प्रवासादरम्यान तिकिटाविना पकडले गेल्यास आणि कॅश नसेल, अशावेळी डिजिटल पेमेंट करून तुरुंगात जाणे टाळू शकता येईल. यासाठी रेल्वे तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन पुरवणार आहे.

तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांपर्यंत हँडहोल्ड टर्मिनल मशीन्सही पोहोचल्या आहेत. इतर ठिकाणीही ते लवकरच सुरू करण्याचे काम सुरू आहे. याद्वारे सर्व टीटीई विना तिकीट प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाकडून ऑनलाइन दंड वसूल करू शकतील. यासाठी प्रवाशाला त्याच्या मोबाइलमधील QR कोड स्कॅन करावा लागेल, यामुळे रेल्वेच्या ऑनलाइन व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.

याशिवाय रेल्वे आता तिकीट काउंटरवर युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे क्यूआर कोड स्कॅन करत तिकीट काढण्याची सुविधा सुरू करेल, तिकीट काउंटरवर क्यूआर स्कॅनिंग सुविधेमुळे प्रवासी तिकिटांचे पैसे ऑनलाइन भरू शकतील. त्यामुळे बरोबर पैसे बाळगण्याची गरज भासणार आहे. प्रवासी UPI, PhonePe, GooglePay सारख्या ॲप्समधून ऑनलाइन तिकीट काढू शकतील. याशिवाय पार्किंग आणि फूड काउंटरवर क्यूआर कोडची सुविधाही दिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *