विदर्भाचा पारा घसरला; कडाक्याच्या थंडीने दोघांचा मृत्यू तर मुंबई, पुण्यातही गारठा वाढणार

या महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा उगारत आहेत. वाहनचालक प्रतितास १६० किलोमीटर वेगाने वाहन चालवित असल्याचे वाहतूक पोलिसांच्याया कारवाईदरम्यान निदर्शनास आले आहे. तसेच प्रतितास १५५ किलोमीटर आणि प्रतितास १५१ किलोमीटर वेगानेही वाहने चालवण्यात येत आहेत.

महामार्गावर वेग मर्यादेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत ६१३ प्रकरणांची नोंद झाली असून या वाहनचालकांवर एकूण १२ लाख २६ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरून जाताना सीटबेल्ट न लावल्यामुळे ७८, तर परवानगी नसतानाही वाहन उभे करणे तसेच अन्य कारणांमुळे १७३ प्रकरणांची नोंद झाली आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या सहकारी प्रवाशाने हेल्मेट परिधान न केल्यानेही वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा ३० प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अपघातांची पन्नाशीपार

भरधाव वेगात चालविण्यात येणारी वाहने आणि वाढते अपघात यामुळे समृद्धी महामार्ग चर्चेचा विषय बनला असून या महामार्गावर आतापर्यंत अपघातांची संख्या पन्नाशीपार गेली आहे. यापैकी तीन प्राणांतिक अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर अपघातांची संख्या पाच असून यामध्ये नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच २१ किरकोळ अपघातांमध्येही २९ जण जखमी झाले असून उर्वरित २१ अपघातांत कोणीही जखमी झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *