पावसाचा हाहाकार! चाळीसगाव तालुक्यात बेमोसमी पाऊस, अतिवृष्टीमुळे पूल पाण्याखाली

चाळीसगाव परिसरात काही भागात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून डोंगरी तितुर नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली असून शहरातील पूलावरून पाणी जात असल्याने वाहनांना जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. पूलावरुन पाणी वाहत असतांना याठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक सुरु असल्याचेही चित्र आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

एकंदरीत पावसाळा संपलेला आहे, सप्टेंबर अखेर व ऑक्टोंबर महिन्यात हिवाळ्याला सुरुवात होते. मात्र, यातच मोठ्या प्रमाणावर बेमोसमी पाऊस पडल्याने त्याचा कापूस पिकांसह इतर रब्बींच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातही सर्वत्र ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी या बेमोसमी पावसाने हजेरी लावली असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *