शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याच्या मालाची आता मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावरच कंम्प्युटरद्वारे नोंदणी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार आवारात माल पोहोचल्याची माहिती समजणार आहे.
आडते व्यापाऱ्यांना आपल्या गाळ्यावर किती शेतमालाची आवक झाली, याची तत्काळ एसएमएसद्वारे माहिती मिळणार असल्याने या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे.
