हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, थीम पार्क, स्विमिंग पूल ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत,ती १०० टक्के क्षमतेने सुरू होतील. सांस्कृतिक कार्यक्रम, भजने आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध आहे. जो हटवला जावू शकतो. लग्न समारंभागसाठी २०० जण उपस्थित राहण्यास परवानगी आहे. यावरील बंधनही हटवले जावू शकते.
राज्यात कोरोना रूग्ण कमी झाल्याने नाट्यगृह, चित्रपटगृह १०० टक्के क्षमतेने सुरू करा अशी मागणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे. तर आता शाळा देखील शनिवार रविवार सुरू कराव्यात असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
