ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये करोना वाढायला सुरुवात

ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाही करोनाची लागण होताना दिसत आहे.त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासना द्वारे केले जात आहे.डोंबिवली, कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. डिसेंम्बर महिन्याच्या सुरवातीला ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये रुग्णसंख्या कमी होती. मात्र आता रुग्ण संख्या वाढत चालली आहे.सध्या सर्व शहरातल्या प्रत्येक दवाखान्या समोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *