मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ( School) 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. राज्यासह मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. केवळ दहावी-बारावीचेच वर्ग भरणार आहेत. तसेच उर्वरित राज्यातील शाळा मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
मुंबई, ठाणे वगळता इतर भागातील शाळा सुरूच ठेवण्याची भूमिका राज्याच्या शिक्षण विभागाने घेतली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
Mumbai School मुंबईत कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (Mumbai Munincipal Corporation) शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे ( School) आणि 11 वीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दहावी आणि बारावी परीक्षा असल्यामुळे ते वर्ग सुरु राहतील.
