सीबीएसईचा बारावीचा निकाल ८२ टक्के

सीबीएसईचा बारावीचा निकाल ८२ टक्के

सीबीएसई बोर्डाचा बारावी परिक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यंदा एकूण ८२ टक्के विद्यार्थी उर्तीण झाले आहेत. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मुलींचे उर्तीण होण्याचे प्रमाण ८७.५६ टक्के आहे तर, उर्तीण होणा-या मुलांचे प्रमाण ७७.७७ टक्के आहे. उर्तीण विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा किंचित घसरण झाली आहे. मागच्या वर्षी ८२.७० टक्के निकाल लागला होता यंदा ८२ टक्के निकाल लागला आहे.

तिरुअनंतपूरम भागातून सर्वाधिक ९५.४१ टक्के विद्यार्थी उर्तीण झाले आहेत. नवी दिल्लीतील न्यू ग्रीन फिल्ड शाळेची एम.गायत्री ९९.२ टक्के गुण मिळवून संपूर्ण देशातून पहिली आली आहे. ५०० पैकी तिने ४९६ गुण मिळवले.

यंदा १०,४०,३६८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डातून बारावीची परिक्षा दिली. १.२ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे. गुण पडताळणीसाठी जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांना उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. १३ ते १७ जून दरम्यान विद्यार्थी यासाठी अर्ज करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *