अफगाणिस्तानमधून काल भारतात दाखल झालेल्या ७८ जणांपैकी १६ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्व ७८ जणांना विलगीकरणात ठेवले गेले आहे.
संसर्ग झालेल्यांमध्ये तीन ग्रंथींचा देखील समावेश आहे. जे काबूलहून सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचे तीन सरूप घेऊन आले होते. मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह यांनी विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबचं सरुप घेतलं. यावेळी हे ग्रंथ डोक्यावर घेऊन ते दिल्ली विमानतळावरून बाहेर आले होते.
वायु सेनेच्या एका विशेष विमानाने सोमवारी काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबेसाठी उड्डाण घेतले होते. २५ भारतीय नागरिकांसह ७८ प्रवशांना घेऊन, हे विमान मंगळवारी सकाळी दुशांबेहून दिल्लीत दाखल झाले होते.