दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”- जितेंद्र आव्हाड

वरळी येथील बीडीडी चाळवासीयांच्या थेट पुनर्वसनाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. या कार्यक्रमाची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, राज्यात दरड कोसळून घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर २७ जुलै रोजी होणार भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पूर आणि नैसर्गिक संकटांमुळे प्रचंड मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर रायगड, साताऱ्यात तर मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. यामुळे राज्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, या दुःख घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कामाचं भूमिपूजनही रद्द करण्यात आलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दलची माहिती दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. “कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे २७ जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भूमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं आव्हाड यांनी म्हटलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *