भारतातील दलित चळवळीत नेहमी आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथ आवाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले.
आवाड यांनी सुरू केलेल्या ‘मानवीय हक्क अभियाना‘च्या माध्यमातून मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. आवाड यांच्या या अभियानामुळे दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. दख्खन विभागातील मागासलेल्या समुदायांच्या आर्थिक उन्नतीसाठी आवाड यांनी समर्पित वृत्तीने उल्लेखनीय कार्य केले.