महाराष्ट्रातील जळगावमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहातील महिला आणि मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वसतीगृहातील या महिलांना आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पोलिसांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.
शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाचे मार्फत निराधार आणि अत्याचार ग्रस्त महिलांच्या मुलींच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. जळगावच्या आशादीप वस्ती गृहातील महिला आणि मुलींना पोलिसांनी आणि अज्ञात व्यक्तींनी पैसे काढून नाचविण्यात आल्याची तक्रार या महिलांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेच्या संदर्भात महिलांनी वसतीगृहाच्या खिडकीतून बोलतांना आपल्यावर अन्याय अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करीत असल्याचं महिलांनी म्हटलं आहे.
