मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ६७ कोटी

परराज्यातील श्रमिकांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहा जिल्ह्यांना अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख ०८ हजार ४२० रुपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती गुरुवारी देण्यात आली. श्रमिकांच्या रेल्वे भाड्यापोटी या निधीतून आत्तापर्यंत एकूण ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिकांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल असे म्हटले होते व पहिल्या टप्प्यात ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ०७० रुपये जमा केले होते. त्यानंतर आता हा अतिरिक्त निधी देण्यात आला असून तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यांत वर्ग करण्यात आला आहे. हे जिल्हे पुढीलप्रमाणे… मुंबई उपनगर- १० कोटी, अहमदनगर- ३० लाख, सातारा- ४९ लाख ६८ हजार ४२०, सांगली- ४४ लाख ४० हजार, सोलापूर- २० लाख, कोल्हापूर- १ कोटी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *