ग्रामीण भागातील शाळांनाही सुट्टी द्या

‘करोना’चा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील शहरी भागांतील सरकारी व खासगी शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील शाळांचाही यामध्ये समावेश करावा, या शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या विषाणूचा फैलाव अनेक देशांत झाला आहे. राज्यातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि अन्य यंत्रणांमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी भागातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याच प्रमाणे ग्रामीण भागाचा यामध्ये समावेश करावा, ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवाव्या, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *