कोल्हापुरातील प्रसिद्ध गाव सलमान खानने घेतलं दत्तक

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सहृदय स्वभावासाठी ओळखला जातो. जगभरात त्याच्या अभिनयाचे जेवढे चाहते आहेत तेवढेच किंबहूना त्याहून जास्त चाहते हे त्यांच्या स्वभावगुणाचे आहेत. नुकताच त्याने महाराष्ट्रातील एक पुरग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव तो दत्तक घेत आहे.

गेल्यावर्षी अर्ध कोल्हापुर पावसाच्या पाण्याखाली होतं. इकडच्या लोकांचं जनजीवन सुरळीत व्हावं यासाठी आता सलमान खानने त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ऐलान फाउण्डेशन आणि सलमान मिळून तिथल्या लोकांच्या आश्रयाची जबाबदारी उचलली आहे.

सलमानने सोशल मीडियावरही पुरग्रस्त पीडितांविषयी दुःख व्यक्त केलं होतं. सलमानच्या मते, घर असणं ही मुलभूत गरज आहे. याच जाणीवेतून तो लोकांची घरं बांधण्यासाठी मदत करणार आहे. तर या कामात सलमानची मदत मिळाल्याने आम्ही आनंदी झालो असं ऐलान फाउंडेशनचे संचालक रवी कपूर म्हणाले.
सलमान खानने याआधीही गरजूंना मदत केली आहे. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींपासून ते सेटवर काम करणाऱ्या स्पॉटबॉयपर्यंत सलमानने साऱ्यांना मदत केली आहे. एवढंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटानेही सांगितलं की, जेव्हा ती इश्क इन पॅरिस सिनेमाचं चित्रीकरण करत होती तेव्हा निर्माती म्हणून तिला पैशांची गरज होती. त्यावेळी सलमानने तिला पैशांची मदत केली होती.
स्पॉटबॉयला मिळवून दिला पैसा

‘दबंग ३’ सिनेमाच्या सेटवर स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या एका मुलाचे फसलेले पैसे मिळवून देण्यास सलमान खानने मदत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *