७ नातवंडे असलेली महिला युवकाच्या प्रेमात

उत्तर प्रदेशातील आग्रा पोलीस ठाण्यात एका हाय होल्टेज ड्राम्याने पोलिसही चक्रावून गेले. हा ड्रामा अनेक तास चालला. डोके चक्रावून टाकणारे हे प्रकरण एका आजीचे आहे. ७ मुलांच्या या आजीला सात नातवंडे आहेत. अशा या आजीचे एका २२ वर्षीय तुरुणावर प्रेम जडले आहे. तिला या तरुणाशी लग्न करायचे आहे. त्रस्त झालेला तिचा पती आणि मुलांनी तिची पोलीस ठाण्यात तक्रार केली खरी, मात्र ही आजी पोलिसांनाही जुमानायला तयार नाही. शेवटी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल केला आणि आजीला समजावून घरी पाठवले. शहरात ही प्रेमकहाणी घराघरात चवीने चर्चिली जात आहे.

आग्र्याच्या एत्मादौला भागात रागणाऱ्या या ४८ वर्षीय महिलेला चार मुलहे आणि तीन मुली आहेत. त्यांपैकी तीन मुलगे आणि एका मुलीचे लग्नही झाले आहे आणि तिला ५ नातू आणि २ नाती आहेत. दोन वर्षांपूर्वी या महिलेचे शेजारी राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाशी प्रेम जुळले. काही दिवसांनी हे तिच्या पतीला आणि मुलांना समजले. दोघांनाही लग्न करायचे होते. विरोध झाल्यानंतर दोघांनी आत्महत्येची धमकीच दिली.

महिलेचा पती आणि मुलांनी आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तिथे देखील महिला आणि हा प्रियकर आपल्या लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. पोलीस निरीक्षक उदयवीरसिंह मलिक यांनी दोघांना समजावले. मात्र त्यांनी मान्य केले नाही. या नंतर पोलिसांनी या तरुणाविरोधात शांतता भंग करण्याबाबत कारवाई केली. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने ही महिला पती आणि मुलांसोबत घरी गेली.

ही महिला आणि तिचा प्रियकर अनेकदा घरातून गायब झाले असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या दोघांमधील संबंधांबाबत त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती झाली होती. अनेकदा दोघांना समजावण्यात आले. मात्र, दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिली. तिची मुले देखील आपल्या आईला समजावण्यात असफल राहिले. शेवटी कोणताही मार्ग न उरल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *