कळव्यातील १२० महिलांची फसवणूक

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या जीएसटीला विरोध करण्याचे काम कंपनीला मिळाले असून दिल्ली येथे थाळीनाद मोर्चा काढायचा आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांना १ लाख रुपये आणि प्रमुख महिलांना ५ लाख रुपये कमिशन मिळेल. तसेच मुंबई-दिल्ली विमान व बस प्रवासाही मोफत मिळेल, असे सांगून आरोपींनी ठाण्यातील कळवा परिसरातील शेकडो महिलांना फसवले आहे. २०१७ पासून त्यांच्याकडून सुमारे ४३ लाख ४० हजारांची रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी या महिलांनी चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुकरम अली मोहब्बत अली अन्सारी हा मुख्य आरोपी असून इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळव्यातील चाळीमध्ये राहणाऱ्या महिलांची ओळख धारावी येथे राहणाऱ्या एका महिलेशी झाली. तिने या महिलेची ओळख मुकरम अली मोहब्बत अली यांच्याशी करून दिली. २०१७मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत एक थाळी मोर्चा आयोजित करायचा आहे. त्यासाठी महिलांची गरज असून त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना १ लाख तर प्रमुख महिलांना ५ लाख देण्यात यणार असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर जाण्याच्या अर्जासाठी प्रत्येक महिलेप्रमाणे ५०० रुपये असे ६० हजार रुपये घेतले. त्यानंतर येथील १२० महिलांची सायन किल्ला इथे बैठक घेतली. त्यानंतर अल्फा गोल्ड नावाची कंपनी असून ती स्विझर्लंड येथील कंपनीशी संलग्न आहे. दिल्लीपर्यंत विमानाने जायचे आणि तेथून परतल्यानंतर प्रत्येक महिलेला पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यानंतर तो अर्ज रद्द झाल्याचे सांगून प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे १ लाख २० हजार भरण्यास सांगितले. त्यानंतर प्रत्येक महिलेस ३ हजार रुपये आणि अर्ज भरायला सांगून ३ लाख ६० हजार मागवले. त्यानंतर काम बिघडले असे सांगून केस लढवण्यासाठी १५ हजार प्रत्येकी, बँकेचा माणूस ५० हजार रुपये देईल असे सांगून १० हजारप्रमाणे १ लाख २० हजार वसूल केले. त्यानंतर ७ लाख आणि पुढे १ लाख असे सुमारे ४३ लाख ४० हजार त्याने लुटले. तसेच बनावट डीडी आणि खोट्या २ हजारांच्या नोटा देऊन फसवणूक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *