दोन दिवसांत बाजारात मिळणार स्वस्त कांदे

कांद्याच्या वाढत्या किंमतींपासून त्रस्त झालेल्या सर्वसानान्यांना आता लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरनंतर आयात केलेले कांदे आता एक-दोन दिवसांमध्ये बाजारात येऊ लागतील. महाराष्ट्र आणि गुजरात येथून नवीन कांद्याच्या पिकाची आवकही वेगाने होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय एमएमटीसीमार्फत ३० हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता या कांद्याची आयातही येत्या२७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याच्या वाढत्या किंमतीला डिसेंबरच्या मध्यावर आळा बसेल. डिसेंबरअखेर कांद्याचे दर खाली येतील असे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे कांदयाची आवड वाढल्यामुळे मग कांद्याची मागणी आणि पुरवठा यातील फरक अतिशय कमी झाल्यामुळे असे होईल असे सरकारी अधिकारी म्हणाला.

देशात कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितले आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर त्याच्या निर्यातीवर बंदी आणली गेली आणि आयात करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तोमर यांनी दिली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले गेले असल्याचे तोमर म्हणाले.

आपण कांदे खाता का?
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना तुम्ही कांदे खाता का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तोमर म्हणाले, ‘मी कांदे खातो. देशात सध्या कांद्याचा मुद्दा पेटला आहे. लोक त्रस्त आहेत. आम्हाला याची जाणीव आहे. कांद्याच्या उत्पादनावर राज्याने दिलेला अंदाज त्यापेक्षा कमी आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *