कोल्हापूरः पन्हाळा अपघातात एक ठार, एक जखमी

पन्हाळा तालुक्यात आसुर्ले गावातील स्वामी समर्थ मंदिरासमोरील उतारावर ट्रक आणि मोटारसायकल अपघातात दुचाकीवरील एक तरूण जागीच ठार झाला. तर दुसरा एक जखमी झाला आहे. निलेश वसंत गुरव (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून सौरभ शिवाजी गुरव (वय २०) जखमी तरुणाचे नाव आहे. दोघेही पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे (सुळे) येथील रहिवाशी असून, मलकापूरजवळील उदगिरी येथे बहिणीला भेटण्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

अपघातग्रस्त तरूण कोतोलीहून कोतोली फाट्याच्या दिशेने जात होते. तर रिकामा ट्रक कोतोली फाट्याकडून पोर्लेला जात होता. दोघे तरुण पल्सर या मोटरसायकलवरून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते. स्वामी समर्थ मंदिरासमोरील वळणावर त्यांची वेगात असलेल्या दुचाकी स्लीप होऊन, दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेले. या अपघातात निलेशचा जागीच ठार झाला तर, सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *