‘केजी टू पीजी मोफत शिक्षण द्या’

‘हक्काच्या शिक्षणाचे कलम ४५ पूर्वीप्रमाणे अंमलात आणण्याची गरज आहे. बंद पडणाऱ्या मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार आवश्यक आहे. ‘केजी टू पीजी’ शिक्षण मोफत मिळणे हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल’, असे प्रतिपादन अॅड. अभय टाकसाळ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनतर्फे विद्यापीठात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विधी सल्लागार कॉम्रेड अभय टाकसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. टाकसाळ यांनी शिक्षणाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र दिला. भारताची राज्यघटना लिहिताना त्यांनी कलम ४५ अनुसार शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारवर निश्चित केली. पण, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कार्यकाळात कलम ४५ मध्ये बदल करण्यात आला. आता सरकारची शिक्षणाची जबाबदारी पालकांवर सोपवण्यात आली. पूर्वीची तरतूद लागू करून मोफत शिक्षण देण्याची गरज आहे, असे टाकसाळ म्हणाले. यावेळी युनियनचे अध्यक्ष किरणराज पंडित, भगवान निकाळजे, किशोर भिंगारे, सुनील बनकर, रतन चाबुकस्वार, दीपक शिगारे, उमाकांत पवार, विजय मुळे, बेबी झाल्टे, मनिषा सलामपुरे, कविता जाधव, संजीवनी निर्मळ, पल्लवी सिरसाठ, दीपाली जाधव, सविता जाधव, ज्योती सोनवणे, सुजाता बनकर, मिना पाखरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *