खय्याम यांच्या निधनाने एका संगीत युगाचा अस्त: लता मंगेशकर

संगीतकार खय्याम हे महान संगीतकार होतेच. पण ते माणूस म्हणूनही ग्रेट होते. त्यांच्या निधनाने एका संगीत युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात महान गायिका, भारत रत्न लता मंगेशकर यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. खय्याम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विटवरून खय्याम यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते महान संगीतकार आणि भले गृहस्थ होते. त्यांच्या निधनाचा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने संगीत युगाचा अस्त झाला आहे, असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये लतादीदींनी खय्याम यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनीदेखील खय्याम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल अाणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे , अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

अनेक अजरामर गीतांना संगीत दिले असून वो सुबह कभी तो आयेगी या गीताचाही त्यात समावेश असल्याचे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *