पुराचा फटका; साखर आणखी महागली

सांगलीकडून आता मालवाहतूक सुरू झाली असली तरी त्याचा साखरेच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात दोन रुपये महाग झालेली साखर या आठवड्यात आता आणखी एक रुपयाने महागली आहे. स्थिती सुधारण्यास एक आठवडा लागण्याची शक्यता आहे.

 अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई सचिव रमणिक छेडा यांनी सांगितले, ‘पुराच्या आधी घाऊक बाजारात साखरेचा दर प्रती किलो ३२ रुपयांदरम्यान होता. तो आता ३४ ते ३५ रुपयांदरम्यान गेला आहे. उच्च दर्जाची साखर ३५.५० रुपये किलो आहे. नवी मुंबई ते मुंबई दरम्यान मालवाहतुकीचा दर १ रुपया प्रति किलो आहे. त्यानुसार आता किरकोळ बाजारात साखर साधारण ४० रुपयांदरम्यान गेली आहे. पूरग्रस्त भागातून मालवाहतूक सुरू असली तरी अनेक ट्रक पुरात बुडल्याने खराब झाले आहेत. सांगलीतील काही महत्त्वाची गोदामे, कराडमधील साखर मीलचे पुराच्या पाण्यात अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *