३०० रुपयांचा हिशोब दिला नाही म्हणून पत्नीचा खून

केवळ ३०० रुपयांचा हिशेब दिला नसल्याच्या शुल्लक कारणावरून पतीने पत्नीची विटांनी ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात घडली आहे.

अशोक गुलाब नरसिंगे असे आरोपीचे नाव असून बीड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अशोक आणि त्याची पत्नी दिपाली हे वीटभट्टी कामगार आहेत. दोघांमध्ये मंगळवारी ३०० रुपयांच्या हिशेबावरून वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झालं आणि अशोकने दिपालीची विटांनी ठेचून हत्या केली. या दाम्पत्याला पाच महिन्यांची मुलगी आहे.

दिपालीची हत्या करून परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अशोक याला उस्मानाबाद येथून अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *