मुंबई -ठाण्यात पुन्हा पावसाची जोरदार हजेरी

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावली आहे. तर माटुंगा, चेंबूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. तसंच येत्या दोन तासांमध्ये मुंबई- ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. भिंवडीतही गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या पावसामुळं काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नवी मुंबईतही पहाटेपासून पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळं रस्त्यांवर सखल भागात पाणी साचून वाहतूक कोंडी होण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 दोन तास पावसाचे

येत्या दोन तासांत मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून समुद्रात ४.७४ मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *