पोलिसानं परत केली ५०,००० रुपयांनी भरलेली बॅग

राज्यातील पोलीस यंत्रणेवर लाचखोरीचा, भ्रष्टाचाराचा, निष्काळजीपणाचा आरोप होत असतानाच मुंबईतील पोलीस नाईक तुकाराम ठोकळ यांनी एका नागरिकाची ५०,००० रुपयांनी भरलेली बॅग परत करून प्रामाणिकपणा आणि कर्तव्य तत्परतेचा आदर्श नमुना समोर ठेवला आहे. तुकाराम ठोकळ यांची सर्वत्र वाहवाही होत असून मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलनेही त्यांची दखल घेतली आहे.

तुकाराम ठोकळ काही दिवसांपूर्वी भायखळा येथे ड्युटी करत होते. त्यावेळी भायखळा पुलावर ५०,००० रुपयांनी गच्च भरलेली एक बॅग त्यांना आढळली. त्यांनी ती लगेच ताब्यात घेतली. बाइकवरून जात असताना जितेंद्र सोनी यांच्या अनावधानाने ती बॅग भायखळा पुलावर पडली होती. त्या बॅगचे शोध घेत जितेंद्र सोनी काही वेळात परत येताच ठोकळ यांनी लगेच त्यांना ती बॅग त्यांच्या हवाली केली. जितेंद्र सोनी यांनीही ठोकळ यांचे आभार मानले आहेत. तुकाराम ठोकळ यांचे त्यांच्या प्रामाणिकपणासाठी सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून ठोकळ यांचं कौतुक केलं आहे. हा सगळा वृतांत सांगत मुंबई फर्स्टचा हॅशटॅगही संबंधित ट्विटर पोस्टमध्ये वापरण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *