लातूर विभागातील १६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २०१९मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील २० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यात लातूर विभागातील तब्बल १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. औरंगाबादेतील तीन तर, अमरावती विभागातील एका विद्यार्थ्यानं ही किमया केली आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येणार आहेत.

दहावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये:

> एकूण निकाल – ७७.१० टक्के

> २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

> कोकण विभाग सर्वात अव्वल. ८८.३८ टक्के विद्यार्थ्यांनी मिळवलं यश

> नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी. अवघे ६७.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

> १०० टक्के गुण मिळवणाऱ्या २० विद्यार्थ्यांमध्ये एकट्या लातूरमधील १६ विद्यार्थ्यांचा समावेश

> यंदाच्या निकालातही मुलींची बाजी. ८२.८२ टक्के विद्यार्थिनींनी ओलांडला दहावीचा टप्पा

> विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचा निकाल १०.६४ टक्क्यांनी जास्त

> राज्यातील १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के.

> १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्याही घसरली. मागील वर्षी ४०२८ शाळांनी मिळवले होते यश

> दिव्यांग विद्यार्थ्यांचा ८३.०५ टक्के

> एकूण ७१ विषयांच्या परीक्षेपैकी १९ विषयांचा निकाल १०० टक्के

> २ लाख ९० हजार ३२ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्यासह फर्स्ट क्लास

> ४ लाख ७३ हजार ३७८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण

> खासगीरित्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३४.७६ टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *