उष्णतेच्या लाटेने ६७ मृत्युमुखी

देशाच्या अनेक भागात उष्णतेचा कडाका वाढत असून उष्णतेच्या लाटेने ६७ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओडिशा यांना बसला आहे. येत्या काही दिवसांत तापमान चढतेच राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

उष्णेतेच्या लाटेने आंध्र आणि तेलंगणमध्ये किमान ४३ जणांनी प्राण गमावले असून ओडिशामध्ये हा आकडा २३ झाला आहे. प. बंगालमध्येही दोघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र, तेलंगणसह महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये तापमापकातील पाऱ्याने ४० अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. तर उत्तरेतील अनेक राज्यांमध्येही उष्ण, कोरडे हवामान आहे.

आंध्र-तेलंगणमधील अनेक ठिकाणी तापमान ४५ अंशांच्या वरच आहे. तेलंगण सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून दिवसाचे तापमान अधिक असताना घराबाहेर न पडण्याचे निर्देश नागरिकांना दिले आहेत. ओडिशामध्येही प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *