व्यापाऱ्यांसाठी गुड न्यूज… राज्य सरकारनं घोषित केल्याप्रमाणे आजपासून एलबीटी रद्द झालाय.
राज्यातल्या तब्बल आठ लाख व्यापाऱ्यांची एलबीटीमधून सुटका झालीय. मात्र, ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या १०६२ व्यापाऱ्यांना मात्र एलबीटी भरावा लागणार आहे.
यामुळं मात्र राज्य सरकारला ७ हजार ६४८ कोटींचा भुर्दंड बसणार असून नागरी भागातून प्राप्त होणाऱ्या मुद्रांक शुल्कातून मिळणारे उत्पन्न महापालिकेला देण्यात येणार आहे.

