नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. नामदेव थोरात (वय ५५) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतात बोअरचे काम सुरू असताना पाणी लागले का?हे पाहण्यासाठी गेले असता
पाय घसरून विहिरीत पडले. व त्यात त्यांचा मृत्यू झाला. थोरात यांनी आपल्या शेतात नवीन ६० फूट खोलीपर्यंत विहीर खोदली. परंतु विहिरीस पाणी लागले नाही. म्हणून त्यांनी आडवे बोअर करण्याचे काम सुरू केले. काम सुरू असताना बोअरला पाणी लागले की नाही ते पाहण्यासाठी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विहिरीच्या कडेला उभे असताना त्यांचा पाय घसरुन ते विहिरीत पडले. डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.