‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छन आहे. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असे सरकारी आकडेच सांगतात,’ असं सांगतानाच ‘कर्जमाफीत सरकारने आपली फसवणूक केली हीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना बनली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांचा संताप आता तरी ओळखा, अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो,’ असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.
रामकथा सांगण्यासाठी प्रसिद्ध असणारे मोरारी बापू गुरुवारी संध्याकाळी कामाठीपुरामध्ये धडकले. ते येण्याआधी कोणीतरी ‘देवमाणूस’ येणार आहे अशी कल्पना येथील शरीर विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात आली होती. यावेळी मोरारी बापूंनी ६० महिलांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अयोध्येत होणाऱ्या रामकथेला येण्यासाठी आमंत्रणही दिलं. या आठ दिवस चालणाऱ्या रामकथेदरम्यान मोरारी बापू मानस गणिका ही वेश्यांच्या आयुष्याशी निगडीत कथाही सांगणार आहे.
संत तुलसीदास यांनी एका शरीर विक्री करणाऱ्या महिलेशी केलेल्या चर्चेवर ही कथा आधारित आहे. या कथेसाठी तरी आवर्जून या अशी विनंती मोरारी बापूंनी या महिलांना केली. यावेळी या महिलांनी त्यांना त्यांची व्यथा सांगितली. स्थानिकांनी त्यांना त्यांच्या समस्याही सांगितल्या. या रामकथेसाठी आम्ही अयोध्येला येऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं.
रामकथेचा रामजन्मभूमीशी काही संबंध नाही
मी आयोजित केलेल्या रामकथेचा रामजन्मभूमीच्या राजकारणाशी काही एक संबंध नाही, असा खुलाासा मोरारी बापूंनी केला आहे. रामकथा संगम हा कार्यक्रम पूर्णत: धार्मिक असून त्याला राजकीय रंग देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
