जयंती, गोमती नदी जलचरांना धोकादायक

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सतर्फे शुक्रवारी जयंती व गोमती नद्यांची पाहणी करण्यात आली. पाण्याच्या तपासणीमध्ये जलचरांना जिवंत राहण्यासाठी तेथे आवश्यक ऑक्सिजनचे प्रमाण नसल्याचे सामोरे आले.

सकाळी आठ ते दहा या वेळेत हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर परिसरातील जयंती नदीचा अभ्यास करण्यात आला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह पुणे येथील पर्यावरणतज्ज्ञ विनोद बोधनकर, जयप्रकाश पराडकर, नीलेश इनामदार, ओमकार गानू यामध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनच शिल्लक नसल्यामुळे जलचर जिवंत राहू शकत नाहीत. ओला व सुका कचरा, मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळते. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. प्रदूषण कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे, अनिल घाटगे, उमेश कुंभार, प्रशांत काटे, प्रमोद पोवार, विजय आर.पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान, असोसिएशनच्या कार्यालयात ‘घनकचरा व्यवस्थापन’ विषयावर चर्चा झाली. तज्ज्ञांनी कचऱ्यापासून इंधननिर्मितीसंदर्भात मार्गदर्शन केले. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी नदी स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी निशांत पाटील, सचिन घाटगे, अतुल दिघे, विनायक दिवाण, सुभाष यादव, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *