लग्नात जेवल्याने २३ जणांना विषबाधा

वांद्रे पूर्वे येथील समाज मंदिर हॉलमध्ये एका लग्न समारंभात भोजनानंतर २३ जणांना अन्नातून विषबाधा  झाली आहे. या सर्वांना तात्काळ व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. विषबाधा झालेल्यांमध्ये ११ पाहुण्यांचा समावेश आहे.

रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. लग्न समारंभात भोजनानंतर २३ जणांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यांना तात्काळ व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये ११ पाहुणे आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. तीन लहान मुलं आणि आठ महिलांवर अद्यापही उपचार सुरू असून बाकीच्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नवरदेव आणि नवरीबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *