सुरतमध्ये १० प्रवाशांचा मृत्यू

टोयोटा इन्होव्हा आणि ट्रकच्या धडकेत इनोव्हातील १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सुरत जिल्ह्यातील बालेश्वर गावाजवळ घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडक्याने हा भीषण अपघात झाला. इन्होव्हातील एका प्रवाशासह ट्रकमधील तिघेजण जखमी झाले .

मृतांपैकी फक्त तिघांची ओळख पटली असून, मनीष सैन (२२), भारत सैन (४७) आणि वैभव परिहार (२४) अशी त्यांची नावे आहेत.

सुरत येथील राष्ट्रीय महामार्गावरील बालेश्वर गावाजवळ ही घटना घडली. या अपघातात कारमधील सर्व जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या टोयोटो इनोव्हा कारमध्ये ११ प्रवासी प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडून येणाऱ्या भरधाव ट्रकला धडक्याने हा अपघात झाला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला ही कार धडकल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *