नाशिक जिल्ह्यातल्या कोटंबी गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटला

देशात सोशल मीडियाच्या व्हायरल मेसेजिंग मधून मॉब लीन्चींग आणि हत्यासत्र सूरु झालं. मात्र नाशिकमध्ये याच सोशल मीडियाचा वापर विधायक कामासाठी करण्यात आला आहे.

पाणीप्रश्न कायमचा सुटला

नाशिक जिल्ह्यातल्या कोटंबी गावाचा पाणी प्रश्न आता कायमचा सुटला आहे. हे शक्य झालं आहे योगेश कासट आणि त्यांच्या मित्रांमुळे. मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणारे योगेश मुळचे लासलगावचे. दुष्काळाचे चटके त्यांनीही सोसले. फेसबुकवर मित्रांनी सुरु केलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून ते पाणीटंचाईच्या कहाण्या वाचत.. जिल्ह्यातील आदिवासींची पाण्यासाठीची धडपड पाहून त्यांनी पाणीप्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेतली. मित्र राहुल मेहता आणि जे. जे. यादव यांच्या मदतीनं कोटंबी गावचा पाणीप्रश्न सोडवला. यासाठी त्यांनी प्रत्येकी पाचशे डॉलर्स म्हणजे भारती चलनात बत्तीस हजार सहाशे रुपये प्रमाणे लाखभर रुपये फोरमच्या बँक खात्यात जमा केले. आणि कोटंबीची तहान भागवली.

आदिवासी बांधवांचा पाणीप्रश्न सोडवणार

इतकच नाही तर या त्रिकुटानं अमेरिकेतील मित्रांकडून आणखी दोन लाख रुपये निधी जमा केला. त्यासाठी त्यांनी एक फंड रेजर लिंक सुद्धा तयार केली. या पैशांतून ते सुरगाणा या दुर्गम तालुक्यातील आदिवासी बांधवांचा पाणी प्रश्न सोडवणार आहेत. विधायक कामासाठी सोशल मीडिया किती प्रभावी साधन आहे याचं हे मूर्तीमंत उदाहरण म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *