एकल पालकत्व समाजासाठी धोक्याचं

मुलांच्या संगोपनासाठी आई-वडिल दोघंही गरजेचे आहेत. एकल पालकत्व हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचं मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केलं आहे.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या एका सचिवांविरोधातील अब्रुनुकसानीच्या याचिकेवर मद्रास हायकोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. ‘ एकल पालकत्व हे लहान मुलांसाठी धोक्याचं असतं. मुलांना आई आणि वडिल दोघांच्याही प्रेमाची गरज असते. त्यांना जर कमी प्रेम मिळालं तर त्यांच्या वागणूकीत बदल होऊ शकतो. अशी मुलं समाजविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा धोका असतो.’ असं मतं न्या. एन. किरूबकरन यांनी व्यक्त केलं आहे.

तसंच केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे विभाजन करावं असं मतही हायकोर्टाने व्यक्त केलं. एक विभाग मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात काम करणारा तर दुसरा मुलांच्या विकासासाठी पाऊलं उचलणारा असावा असा सल्लाही हायकोर्टाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *